Saturday, December 6, 2014

आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll १ ll 
मग तो कृपासिंधु निवारी साकडे l येर ते बापुडे काय  रंक ll २ ll 
भयाचिये पोटी दुख्खाचीया राशी l शरण देवासी जाता भले ll ३ ll 
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता l चिंतावा तो आता विश्वंभर ll  ४ ll 


तुकारामांच्या ज्या रचनांना म्हणींचे रूप प्राप्त झाले आहे त्या पैकी ह्या अभंगाचा पहिला चरण आहे . अशी अनेक उदाहरणे दाखवता येतिल. 

सर्व सामान्य माणसे दुखः आणि पीडा यांनी त्रस्त झाली की  हा चरण म्हणतात . एक असहायता प्रगट करण्याची ही जणू रीतच झाली  आहे . प्रत्यक्षात तुकाराम  महाराज निराश न होण्यासाठी उपाय सांगत आहेत देवावर भार घातला की आपली सहनशक्ती वाढते . देवाशिवाय  अन्य कोणी दुखः निवारण करायला समर्थ नाही . देब परिस्थिति तरी बदलेल किंवा आहे ती परिस्थिति स्वीकारायचे सामर्थ्य देईल . देवाला शरण गेल्यावर तो कृपा करणारच कारण तो कृपासिंधु अहे. इतर म्हणे येर तेवढे शक्तिमान नाहीत म्हणून  बापुडे .  मुळात दुखः भयापोटी निर्माण होते. भय काहीतरी गमावण्याच्या शक्यतेमुळे निर्माण होते. मग ते धन असो मान असो व जीवित.  हे काहीही  आपले नसताना आपण ते आपले मानतो आणि गमावण्याची भीती बाळगतो . " सर्व काही देवाचे " हा भाव धरिला की देवाचे होते ते देवापाशी गेल्याची भीती कशाला ? भीती नाही तिथे दुखः नाही . 
तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ काही न करता विश्वंभराचे  चिंतन करावे . " विश्वंभरे  विश्व सामावले पोटी  , तेथेच शेवटी आम्ही असु  " असे दुसरीकडे महाराजांनी सांगितले आहे . जगाचे कल्याण करतो तो आपलेही करणारच . आपण स्वतःच स्वतःचे कल्याण  काय हे ठरवायचे कशाला ? तो भार ज्याचा आहे त्याच्यावर ठेवावा म्हणजे  आपण मुक्त होऊन जाऊ . 

1 comment: